शुक्रवार, ३० मे, २०१४

मोदींना विरोध सुरु

मोदींना विरोध करण्याची विचारवंत आणि बुद्धिवंत तसेच तथाकथित धर्मनिरपेक्षवादी यांची धडपड सुरु झाली आहे. सोमवारी 26 मे 2014 ला मोदिंनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. आज त्यांच्या या पदाचा चौथा दिवस. खरे तर तीसरा. कारण संध्याकाळी सहा वाजता त्यांनी शपथ घेतली आहे. म्हणजे मागच्या तीन दिवसांत कायकाय विरोधी घडले त्याचा प्रथम आढावा घेऊ.

दि. 27.5.14- अशी बातमी आली की मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांनी चुकीचे शिक्षण दाखवले आहे. त्याला कॉंग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांनी आक्षेप घेतला आहे. दहा वर्षांपूर्वी आपल्या निवडणुक शपथपत्रात त्यांचे शिक्षण पदवी असे दाखविले होते आणि आताच्या शपथपत्रात बी. कॉम. पार्ट वन पर्यंत शिक्षण झाले आहे असे दाखविले आहे. शिक्षनासंबन्धी निर्णय घेणारा मंत्री उच्च विद्याविभूषित असला पाहिजे असे त्यांचे म्हणणे. 
आजच्या मटा (दि. 29 मे) च्या अग्रलेखात कॉंग्रेसची चांगलीच चंपी केली आहे. (मटा भाजपच्या बाजूने लिहतोय हे एक आश्चर्य) अग्रलेखात म्हणलय 'वास्तविक कोणत्याही व्यक्तीची पात्रता त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, शैक्षणिक पात्रता यांपेक्षा त्याची कार्यक्षमता, निर्णयक्षमता यावर ठरली पाहिजे; कारण कोणत्या कुटुंबात जन्माला यायचे याचे स्वातंत्र्य कोणाला नसते. शिक्षणाचा हक्क देण्याचा कायदा करावा लागणाऱ्या भारतासारख्या देशात दर्जेदार शिक्षण घेणेदेखिल अनेकांच्या आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळे या सगळ्यावर एखाद्याची पत किंवा प्रतिष्ठा ठरविली जाणे सर्वार्थाने गैर आहे. कोणतीही थोर शैक्षणिक पात्रता नसताना सोनिया गांधी यांनी गेली दहा वर्षे हा देश चालवला. यामध्ये त्यांची चेष्टा करण्याचा हेतू नाही; (शेवटी हेही भितभितच) पण त्यांनी हे सिद्ध केले की शिक्षणाचा आणि देश चालवण्यासाठी लागणाऱ्या पात्रतेचा काही संबंध नाही.'

 (वासा फिरला की सगळेच फिरते अशी गत झालेय कॉंग्रेसची.) वसंतदादांचे उदाहरण देऊन बरेच काही लिहून कॉंग्रेसला सल्ला दिलाय की त्यांनी चुकुनही या वाटेला जाता कामा नये. आतापर्यंत म्हणजे 16 मे ला निकाल जाहिर झाल्यापासून मटाचे अग्रलेख मापूनतोलून असतात. पण आता शेजारीच भाजप विरोधी विचारवन्तांचे लेख छापून पोटातील गरळ ओकुन घेतात. ते पुढे पाहुच. दूसरी NDA विरोधी बातमी.

दि. 28.5.14 - शिवसेनेला बिनमहत्वाचे खाते दिले म्हणून अनंत गीते आणि शिवसेना नाराज. आता ही बातमी खरी की खोटी देव जाणे. परंतु NDA मध्ये भांडणे सुरु झाली आहेत हा या बातमीचा मुख्य उद्देश. कारण आजची बातमी अशी आहे की शिवसेनेला पुढील मंत्रीमंडळ विस्तरात चांगले खाते देण्यात येईल. त्यामुळे गितेंनी मंत्री पदाचा भार स्वीकारला. आता तुम्हीच सांगा की अशी नाराजी पत्रकारांना सांगायला काय गीते, उद्धव आणि शिवसेना वेडे किंवा बुद्धू आहेत काय?

आता मुख्य मुद्द्याकडे वळु. आजच्या मटा मधे अग्रलेखाच्या बाजुलाच छाया दातार
(स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या) यांचा 'विचार' या सदराखाली 'विकासाच्या भपक्याने दिपली तरुणाई' हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या बाईणे, अरेरे माफ करा मैडमणे कारण बाई म्हणणे काही जनिंना आवडत नाही. तर या मैडम ने मोदींच्या विजयाला तरुणाईला जबाबदार धरले आहे. त्यांच्या लेखातील ऐकेका मुद्यांचा विचार करू.

1.'एक तरुण सिग्नल हिरवा नसताना सिग्नल तोडून एका वृद्ध बाईला चाटून गेला आणि तिचा तोल जाताजाता वाचला. असे बरेच बाइकस्वार सुसाट वेगाने पुढे जात होते. हा केवळ वाहतुकबेशिस्तिचा प्रकार नाही तर मानसिकते मधील बदल आहे आणि तो गेल्या वर्ष-दोन वर्षातील आहे.'

असे बरेच काही लिहून मैडम ने तरुनाई ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
मैडम ना असे तर म्हणायचे नाही ना  की कॉंग्रेसला आणखी वेळ द्यायला पाहिजे होता. इतके उतावीळ व्हायला नको होते. लोक गरीब राहिले म्हणून काय झाले. ठेविले अनंते (कांग्रेसणे) तैसेचि रहावे । चित्ती असू द्यावे समाधान । या बाई (येउदे राग) कुठल्या जगात वावरत आहेत. अहो बाई जमाना वेगाचा आहे. तुमच्या सारखा स्कूटरवर पाठीमागे बसून वाट पहाण्याचा नाही. तुम्ही हेही म्हणाल-
कॉंग्रेसने भ्रष्टाचार केला म्हणून काय झाले? देश तर त्यांच्याच बापाचा आहे. बापाचे पैसे खाल्ले त्याला भ्रष्टाचार म्हणायचे काय? वेडे तरुण कुठले ! एव्हढी काय घाई झाली होती की कॉंग्रेसला तुम्ही पूर्ण झोपवले. त्या राहुल बाळाला तोंड लपवायची पाळी आणली. 

जावयाने (रॉबर्ट वाड्रा) लाखाचे फक्त 300 कोटी केले तर तुम्ही कॉंग्रेसला पळता भुई थोडी केली? आपली संस्कृती काय ? जावयाला आपल्या संस्कृतीत किती मान? तुम्ही तरुण लोक आपली संस्कृतीच विसरले !

सगळ्या मंत्र्यांना हरवून मान खाली घालायला लावली. कारण तेही आपल्या जावयासारखेच ना? बरे त्या मनमोहन सिंगांचे काय चुकले ? 

मौनीबाबा म्हणून त्यांची हेटाळणी करता. आपल्या तुकोबारायांनी म्हंटलेच आहे ना ' तुका म्हणे उगे रहा, जे जे व्होइल ते ते पहा । कलमाडी साहेबांनी करोडो रुपये खाल्ले तेव्हा सिंग उगे राहिले.


ए. राजा आणि कळिमोळी 75 हजार कोटींचा घोटाळा केला तरी ते गप्पच राहिले.

कोळसा खानिंना परवानगी देतानाही ते निमूटपणे सह्या करीत राहिले. इतकेच काय राहुल बाबांनी भर पत्रकार परिषदेत कलंकित आमदार खासदार यांना संरक्षण देण्याचा कायदा फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकला तरी ते काहीच बोलले नाहीत.
तुकारामांचे विचार त्यांनी किती तंतोतंत पाळले. बरे आपल्या तुकारामांचे जाऊद्या. महात्मा गांधींनी मौनाचे महत्व किती सांगितले आहे. अशा आदर्शाचा पाठ घालून देणाऱ्या माणसाच्या कॉंग्रेसला तुम्ही त्सुनामी प्रमाणे होत्याचे नव्हते केले ?

2. 'वर उल्लेख केलेल्या सिग्नल तोडन्याच्या प्रकाराला पूर्वी मी 'माजोरीपणा' असे म्हटले असते, आता मला नवीन शब्द सापडला आहे. मोदींच्या निवडणुकीनंतर 'हे तरुणाईच्या आशा अकांक्षांचे प्रतिक आहे' असे मानले जाऊ लागले आहे.'

आता ह्या बाइंना 'माजोरीपणाला' शब्द कुठला सापडला तर पूर्ण वाक्य. शब्द आणि वाक्य यातील फरक समजू नये या विदुषिन्ना? पण असं फक्त यांचेच झाले आहे असे नाही. झाडून सारे बुद्धिवंत आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवादी यांचे असेच हाल चाललेत. आपण काय बोलतो आहोत, काय लिहतो आहोत हे त्यांना कळेनासे झालेय. या लेखावरील वाचकांच्या प्रतिक्रिया वाचल्या तर आपल्या लक्षात येईल. एकेकाने बाईची अशी खेचली आहेकी विचारता सोय नाही.

या बाई एकतर भाजप विरोधी किंवा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या असल्या पाहिजेत. कारण स्त्री चळवळच्या कार्यकर्त्या असलेल्या छाया दातार यांच्या हेही लक्षात येऊ नये काय की मोदी सरकार मधे सात मंत्री महिला आहेत. मोदिंनी महिलांना योग्य स्थान दिले याचा लेखात ओझरताही उल्लेख नाही. अभिनंदन नाही की शुभेच्छा नाहीत. यांत काही हितसंबंध तर गुंतले नाहीत ना ? याची शंका येते.

बाई झोपेत बरळताहेत असे लेख वाचून कोणीही सांगू शकेल. त्यांच्या लेखावरील वाचकांच्या प्रतिक्रियातर अवर्जुन वाचण्या सारख्या आहेत. मी आपलं बस करतो नाहीतर मीही बरळायला लागायचो. कारण वाईट संगतीने माणुस बिघडतो असा समज आहे. अच्छे दीन आने वाले है। मग आपण कशाला घाबरायचं !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा