मटाने आता अडून अडून मोदी सरकार वर वार करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवार दिनांक 5 जून 2014 च्या मटाच्या 'बहुतांची अंतरे' या वाचकांच्या सदरात दोन पत्रे अशी प्रसिद्ध केली आहेत. जी मला वाटते मोदींच्या विरोधी आहेत. मटाचा हा दुसऱ्याच्या नथीतुन बाण मारण्याचा प्रकार आहे.
पाहिले पत्र आहे निलीमा देशपांडे यांचे. या बाइंनी 'तरच विकास साधता येईल' या मथळ्याचे पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी लिहले आहे की 29 मे च्या अंकातील छाया दातार यांचा 'विकासाच्या भपक्याने दिपली तरुनाई' या लेखात सद्य परिस्तिथिचे अचूक विश्लेषण केले आहे. मी माझ्या मागच्या लेखात छाया दातारांच्या लेखाविषयी लिहले आहे. त्या लेखातील वाचकांच्या प्रतिक्रिया मटा ऑनलाइन वर पहिल्या तर लक्षात येईल की जवळजवळ 99% लोक बाईंच्या मताशी सहमत नाहीत. मग मटाच्या छापील आवृत्तीतीत एकही पत्र लेखविरोधी कसे नाही आणि फक्त लेखाशी सहमत असल्याचे पत्रच कसे आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे ते पत्र छापून आणणे आणि आपल्या मताविरोधी पत्राला केराची टोपली दाखवणे हे मटाही करतोच. मग 'आमचा पक्षपात फक्त वाचकांशी आहे. आमची बांधिलकी फक्त वाचकांबरोबर' अश्या जाहिराती मटा कां करतो. देशपांडे बाईंच्या पत्रातील एक वाक्य 'पण त्याच बरोबर तरुनाईने ज्या पक्षाला भरगोस मते दिली त्या पक्षाच्या 'काळ्या' बाजुकडे मतदारांनी सध्या तरी दुर्लक्ष केल्याचे आढळते.' असे आहे आणि हेच वाक्य मटाला पत्र प्रसिद्ध करण्यास पुरेसे आहे.
याच मटाच्या अंकात दुसरे पत्र आहे राजीव जोशी, नेरळ यांचे 'भाजप आणि परिस्थीतीचा रेटा'. या पत्रात लिहले आहे की 'सरहद्दीपलीकडील परिस्थितीत सुधारणा झाल्याशिवाय पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करण्यास भाजपाने कडाडून विरोध केला होता. परंतु सीमेपलीकडील स्थितीत काडीचीही सुधारणा न होताच पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मानाचे आमंत्रण दिले गेले, आणि भाजपाने आपल्या कोलांट्या उड्यातील नैपुण्याचे प्रदर्शन केले. भाजप व संघाने अवास्तव आणि अव्यवहार्य कार्यक्रमाची हाक दिली हे स्पष्ट होते. असा अतिरंजित कार्यक्रम घेणारे हे नेतृत्व अ-दूरदर्शी आहे? किंवा अप्रामाणिक आहे?'
आता ह्या राजीव साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरजच नाही. नवाझ शरीफ यांना शपथविधिला बोलवणे याबद्दल वृत्तपत्रात तसेच इतर प्रसारमाध्यमांत बरीच चर्चा आणि चर्वितचर्वण झाले आहे आणि जवळजवळ सर्वांनी मोदींना शाबासकी दिली आहे. यांत मटाही सामिल आहे (वाचा मटा अग्रलेख 'सत्तेचे भान' दि. 28 मे 2014)
या राजीव जोशी यांना 'सरहद्दीपलीकडील, सिमेपलीकडील' म्हणायचे आहे की 'सीमे- वरील' याचा उलगडा होत नाही. सिमेपली- कडील परिस्थिति बदलणे सध्या तरी कोणाच्याही पिताश्रींच्या हातात नाही. (उदा. तेथील दहशतवाद, गरीबी, अमेरिकेसमोरील लाचारी इत्यादी). दुसरे असे की आठ दिवसांत कोणालाही अ-प्रमाणिक किंवा अ-दूरदर्शी म्हणणे किंवा ठरवणे म्हणजे अतीच झाले नाही का?
मटाला काय किंवा इतर माध्यमांना काय आता पर्यंतच्या मोदींच्या करभाराविषयी प्रशंशाच करावी लागतेय. आणि म्हणून वाचकांच्या पत्रांचा व इतर लेखांचा आधार घेउन टिका करत आहेत.
आता आजचा (6 जून) मटा पहा. यांत मंथन या पानावर 'मराठी मुलखात- दक्षिण महाराष्ट्र' या सदरात एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाचे नाव आहे 'कलहाने करवीरनगरी शरमिंदी' आणि लेखक आहेत विजय चोरमारे.
परवा कोल्हापुर शहरात तोडफोड, दगडफेक, जाळपोळ झाली. त्याचे कारण होते फेसबुक वर कोणीतरी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी केली. चोरमारे यांनी याचे खापर शिवसेना आणि भाजप यांच्यावर फोडले आहे. त्यांच्या लिखाणाचा रोख असा आहे की शिवसेना आणि भाजप हे निवडणुकी आधी दंगली घडवतात. मागच्या वेळेस मिरजेला दंगल झाली त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत्या. दंगलीचा फायदा शिवसेना अणि भाजप यांना झाला. म्हणून या पक्षांचे नेते तरुण मुलांची माथी भडकवतात व हळूच पलायन करतात. ते म्हणतात 'मागच्या वेळेस दंगलीनंतर भाजपने मिराजेची जागा खेचून आणली. मिरजेबरोबर सांगली जिल्ह्यातील सांगली आणि जत या जागाही भाजपने जिंकल्या. कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी भाजपने तर हातकनंगले राखीव मतदारसंघ शिवसेनेने जिंकला. हे सगळे मिरज दंगलीचेच फलित होते, हे नाकारता येत नाही.'
आता प्रश्न असा पडतो की निवडणुकीचे राजकारण इतके सोपे आहे काय? की घडवा दंगल आणि या निवडून. मग काय प्रचार करायला नको, पैसा खर्च करायला नको, भाषणबाजी नको की काही नको. महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतात तीन चतुर्थांश मतदार संघ असे असतील की जेथे दंगली घडू शकतात. मग अता पर्यंत भाजप दंगली घडवून संपूर्ण भारतात निवडून आली असती. तेच शिवसेनेविषयी महाराष्ट्राबाबत म्हणता येईल. आणि कॉंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न 50-60 वर्षां पुर्वीच पूर्ण झाले असते.
लेखकाला हेही ज्ञात नसावे की ही तोडफोड, जाळपोळ फक्त कोल्हापुर मधेच न होता, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झाली आहे. आणि कोणताही महाराष्ट्रात जन्मलेला मनुष्य शिवरायांची बदनामी स्वत:हुन निवडनुक जिंकन्यासाठी करणार नाही.
तसेच दंगलच करायची होती तर ती लोकसभा निवडणुकी पुर्वीही करता आली असती, मग आताच का याचं काय उत्तर लेखाकापाशी आहे. लेखाचा शेवट लेखकाने कसा केला आहे तो पहा. 'राजकीय गरजेपोटी असे प्रसंग भविष्यात घडतील, घडवले जातील. त्या शिवाय, काही घटकांना अच्छे दिन आल्याची जाणीव होणार नाही'. हा सरळ भाजपावर आरोप आहे.
म्हणुनच म्हणतोय मटासारख्या कॉंग्रेस धर्जिन्या लोकांची धडपड चालू झाली आहे. आणि ती विधानसभा निवडणुकी पर्यंत चालूच राहील.
या राजीव जोशी यांना 'सरहद्दीपलीकडील, सिमेपलीकडील' म्हणायचे आहे की 'सीमे- वरील' याचा उलगडा होत नाही. सिमेपली- कडील परिस्थिति बदलणे सध्या तरी कोणाच्याही पिताश्रींच्या हातात नाही. (उदा. तेथील दहशतवाद, गरीबी, अमेरिकेसमोरील लाचारी इत्यादी). दुसरे असे की आठ दिवसांत कोणालाही अ-प्रमाणिक किंवा अ-दूरदर्शी म्हणणे किंवा ठरवणे म्हणजे अतीच झाले नाही का?
मटाला काय किंवा इतर माध्यमांना काय आता पर्यंतच्या मोदींच्या करभाराविषयी प्रशंशाच करावी लागतेय. आणि म्हणून वाचकांच्या पत्रांचा व इतर लेखांचा आधार घेउन टिका करत आहेत.
आता आजचा (6 जून) मटा पहा. यांत मंथन या पानावर 'मराठी मुलखात- दक्षिण महाराष्ट्र' या सदरात एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाचे नाव आहे 'कलहाने करवीरनगरी शरमिंदी' आणि लेखक आहेत विजय चोरमारे.
परवा कोल्हापुर शहरात तोडफोड, दगडफेक, जाळपोळ झाली. त्याचे कारण होते फेसबुक वर कोणीतरी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी केली. चोरमारे यांनी याचे खापर शिवसेना आणि भाजप यांच्यावर फोडले आहे. त्यांच्या लिखाणाचा रोख असा आहे की शिवसेना आणि भाजप हे निवडणुकी आधी दंगली घडवतात. मागच्या वेळेस मिरजेला दंगल झाली त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत्या. दंगलीचा फायदा शिवसेना अणि भाजप यांना झाला. म्हणून या पक्षांचे नेते तरुण मुलांची माथी भडकवतात व हळूच पलायन करतात. ते म्हणतात 'मागच्या वेळेस दंगलीनंतर भाजपने मिराजेची जागा खेचून आणली. मिरजेबरोबर सांगली जिल्ह्यातील सांगली आणि जत या जागाही भाजपने जिंकल्या. कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी भाजपने तर हातकनंगले राखीव मतदारसंघ शिवसेनेने जिंकला. हे सगळे मिरज दंगलीचेच फलित होते, हे नाकारता येत नाही.'
आता प्रश्न असा पडतो की निवडणुकीचे राजकारण इतके सोपे आहे काय? की घडवा दंगल आणि या निवडून. मग काय प्रचार करायला नको, पैसा खर्च करायला नको, भाषणबाजी नको की काही नको. महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतात तीन चतुर्थांश मतदार संघ असे असतील की जेथे दंगली घडू शकतात. मग अता पर्यंत भाजप दंगली घडवून संपूर्ण भारतात निवडून आली असती. तेच शिवसेनेविषयी महाराष्ट्राबाबत म्हणता येईल. आणि कॉंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न 50-60 वर्षां पुर्वीच पूर्ण झाले असते.
लेखकाला हेही ज्ञात नसावे की ही तोडफोड, जाळपोळ फक्त कोल्हापुर मधेच न होता, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झाली आहे. आणि कोणताही महाराष्ट्रात जन्मलेला मनुष्य शिवरायांची बदनामी स्वत:हुन निवडनुक जिंकन्यासाठी करणार नाही.
तसेच दंगलच करायची होती तर ती लोकसभा निवडणुकी पुर्वीही करता आली असती, मग आताच का याचं काय उत्तर लेखाकापाशी आहे. लेखाचा शेवट लेखकाने कसा केला आहे तो पहा. 'राजकीय गरजेपोटी असे प्रसंग भविष्यात घडतील, घडवले जातील. त्या शिवाय, काही घटकांना अच्छे दिन आल्याची जाणीव होणार नाही'. हा सरळ भाजपावर आरोप आहे.
म्हणुनच म्हणतोय मटासारख्या कॉंग्रेस धर्जिन्या लोकांची धडपड चालू झाली आहे. आणि ती विधानसभा निवडणुकी पर्यंत चालूच राहील.
.jpg)

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)